पेज

२२ मे, २०२१

'जरा'च विसावू 'त्या' वळणावर...!!!

            'माणूस हा समाजशील प्राणी आहे' याचा प्रत्यय पदोपदी येत असतो. आपल्या सभोवती खूप सारी माणसं भावना व्यक्त करत, आनंद दुःख झेलत जगत असतात. त्यात कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपणही सहभागी असतो. एवढ्या सगळ्या माणसांत असूनही एकटेपणा जाणवतो. सगळं व्यवस्थितच चालू असतं, पण मन खूप त्रासदायक... माणसाला स्वस्थ राहू देत नाही. कधी विनाकारण अस्वस्थ होईल, कधी आनंदाने ओसंडून जाईल याचा वेध लागला तरच नवल नाही का...!

            एकटेपणात अस वाटत आयुष्य एखाद्या नवीन, अनोळखी अशा वळणावर येऊन ठेपलं आहे. म्हणून कदाचित, त्या वळणापर्यंत सोबत करणारी पूर्वीची आपली माणसं आणि वळण पार केल्यानंतर पुढे असणारी माणसं दिसत नसतील..., त्यालाच आपलं भाबड मन एकटेपणा समजत असेल...!!!

            नियतीने पुढे काय मांडलंय हे 'ते' वळण पार केल्याशिवाय नाही कळणार ना! त्यामुळे अशा वळणाला अंत न समजता केवळ 1 विसाव्याची जागा म्हणून तिथून पुढे जाता आलं पाहिजे. वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी आणि वाळल्यानंतर स्वागत करणारी खूप माणसं वळणाच्या मागे पुढे उभी असतील.., मात्र वळण आपल्याला आणि आपल्याच हिम्मतीने, आत्मविश्वासाने पार करावं लागतं. त्यामुळे न थांबता "जरा'च विसावू त्या वळणावर'....!!!!



इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म...

Most viewed