पेज

१८ मे, २०२१

मी आणि शाळा

           शाळेची भिती कधी वाटत नव्हतीच, शाळा म्हणजे दुसरं घरचं जणू! उत्सूकतेला मात्र मर्यादा उरली नव्हती कारण, मी आता मोठ्या वर्गात जाणार होते. नविन गणवेश, दप्तर, पुस्तक याचा तर आनंद होताच. तरीही शाळेच्या पहिल्या दिवशी मन धडधडतच होतं...! तस पहायला गेलं, तर आम्ही सर्व 4 थी चे विदयार्थी एकाच शाळेत, एकाच वर्गात होतो पण, मन भोळं घाबरतच होतं. आत्तापर्यंत दिवसभर एकच शिक्षक शिकवायचे. मात्र, इथे दर अर्ध्या तासाला घंटा वाजली की शिक्षक बदलायचे, याच तर नवलच निराळं!

            मला मराठीचा तास जरा जास्तच आवडायचा. कदाचित, जन्मतःच माझी मराठीशी नाळ जोडली गेली असेल! आम्हाला 5 वी मध्ये 'मला आवडते केली वाट वळणाची' ही कविता शिकवली होती आणि दुसऱ्या दिवशी ती सहाभिनय वर्गात सादर करायची होती. मला वाटतं, तो दिवस सगळ्या classmates ना चांगला आठवत असेल.

          अजून एक सारखी आठवणारी गोष्ट म्हणजे,- शाळेत परवानगी नसताना सर्वांनी वर्गात रंगपंचमी साजरी करून वर्गाचा चेहरामोहराच बदलला होता. त्यानंतर सरांनी चांगलाच चोप दिला होता ती गोष्ट सोडा..., आणखी एक वर्गातली गमतीशीर गोष्ट म्हणजे, गव्हाबरोबर खडे रगडले जात. विशेषत: खेळाच्या तासाला, चुक जरी काहीजणांची असली तरी प्रसाद सगळ्यांनाच मिळायचा. पण, हळूहळू जशा इयत्ता वाढू लागल्या, तसे मुली शांत, हुशार, अभ्यासू आणि मुलं मात्र आगावू, भांडखोर, चेष्टेखोर असं काहिसं झालं

           का कोण जाणे पण आमच्यात मुला मुलींच कधी जमलच नाही. अक्षरशः ३६ चा आकडा ! हा मात्र याला एक गोष्ट अपवादात्मक- शाळेचे क्रिडा सप्ताहाचे दिवस!!! आनंदोत्सवच म्हणा ना. मला चांगलच आठवत की, मुली कधी खो-खो च्या पुढे गेल्या नाहित आणि पोरांनी एक खेळ खेळायचा सोडले नाही!     

 मुला-मुलींनी मिळून केलेली खो-खो ची Practice, फेब-मार्च मधील सकाळची शाळा, रक्षाबंधन, ground वरचा वर्ग, जागा पकडण्याची धडपड या गोष्टी आठवल्या की उगाच मोठे झालो, असं वाटतं. मात्र यावेळी, मला.. "बदल हा निसर्गाचा नियमच आहे" हे एका सरांनी माझ्या माथी मारलेले वाक्य आठवले. असो, या आठवणी एवढ्यावर थांबणार नाही. 

         माझ्यासाठी शाळा ही नेहमीच आनंद, उत्साह, जिद्द, स्पर्धा, आस्थेचे प्रेरणास्थानचं! 

           वयक्तिक आयुष्यासाठी शाळेने मला खूप काही दिलं. अगदीच माझ्यातली मी ओळखायला शाळा आणि अर्थातच वंदनीय शिक्षक यांचा वाटा आहे हयात वावगं काही नाही. थोडक्यात, स्वतःची आवड, छंद, कला ओळखायला आयुष्य निधुन जातात, तिथं माझ्या शाळेने जगाच्या स्पर्धेत उतरण्या आधीच माझ्यातला शस्त्रांना धार लावून लढण्यास सज्ज केलं!

         कितीही नाकारला, तरी शाळा, शाळे तील मित्र-मैत्रिणी यांच्याप्रती जी आपुलकी आहे, ती कॉलेजमध्ये कितीही मोठं Friend circle असलं, तरी ते दिवस आणि आपुलकी विरळाचं!

नाही का... !!!

१५ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर लिहिले आहे शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या..🤩✌️

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म...

Most viewed