पेज

२२ मे, २०२१

'जरा'च विसावू 'त्या' वळणावर...!!!

            'माणूस हा समाजशील प्राणी आहे' याचा प्रत्यय पदोपदी येत असतो. आपल्या सभोवती खूप सारी माणसं भावना व्यक्त करत, आनंद दुःख झेलत जगत असतात. त्यात कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपणही सहभागी असतो. एवढ्या सगळ्या माणसांत असूनही एकटेपणा जाणवतो. सगळं व्यवस्थितच चालू असतं, पण मन खूप त्रासदायक... माणसाला स्वस्थ राहू देत नाही. कधी विनाकारण अस्वस्थ होईल, कधी आनंदाने ओसंडून जाईल याचा वेध लागला तरच नवल नाही का...!

            एकटेपणात अस वाटत आयुष्य एखाद्या नवीन, अनोळखी अशा वळणावर येऊन ठेपलं आहे. म्हणून कदाचित, त्या वळणापर्यंत सोबत करणारी पूर्वीची आपली माणसं आणि वळण पार केल्यानंतर पुढे असणारी माणसं दिसत नसतील..., त्यालाच आपलं भाबड मन एकटेपणा समजत असेल...!!!

            नियतीने पुढे काय मांडलंय हे 'ते' वळण पार केल्याशिवाय नाही कळणार ना! त्यामुळे अशा वळणाला अंत न समजता केवळ 1 विसाव्याची जागा म्हणून तिथून पुढे जाता आलं पाहिजे. वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी आणि वाळल्यानंतर स्वागत करणारी खूप माणसं वळणाच्या मागे पुढे उभी असतील.., मात्र वळण आपल्याला आणि आपल्याच हिम्मतीने, आत्मविश्वासाने पार करावं लागतं. त्यामुळे न थांबता "जरा'च विसावू त्या वळणावर'....!!!!



२० मे, २०२१

So called एकता, बंधुता, समता


         माणसाच्या जिवन जगण्याच्या ना खूप वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. कुणी इतरांसाठी जगतो, कुणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. काही जण अगदी निखळ, निस्वार्थी भावनेने, आत्मिक समाधानाने समाजाच्या दृष्टीने आयडियल असे जीवन जगत असतात. पुण्यातील "Z bridge" नावाच्या 'पुलाखाली' मात्र काही लोक असे आहेत, जे मृत्यू माणसाच्या हातात नाही... आणि जन्म तर त्याहून नाही. आणि पदरी पडलेल्या दुर्दैवी जगण्याला दुसरा नाही म्हणून कुढत कुढत जीवन जगतात.
         बघा ना नियतीची करणी..., त्याच bridge "वर" आपल्या प्रेमाची फक्त चैन पूर्ण करण्यासाठी पैसे उधळणारे प्रेमी युगुल आहे, तर "खाली" या पैशासाठी आपल्या माईचा प्रेमळ पदर सोडून त्याच पैशासाठी दिवसरात्र वणवण आहे. किती हा विरोधाभास ना !
         या लोकांना पाहिलं की, प्रश्न पडतो यांना जीवनाचा अर्थ माहिती आहे का? आपण स्वप्नांशिवाय जीवन जगू शकत नाही. पण इथे स्वप्न म्हणजे काय तेच माहित नाही. आपल्याकडे बाळ बोलायला लागल्यावर त्याला आई, वडिल, आजी आजोबा बोलायला शिकवले जाते. मात्र इथे 10 वर्षांच्या मुलाला त्याच्या जन्मदात्याच नाव ही माहिती नाही !
        एक फार गमतीची गोष्ट जाणवली, त्यांची नावं राम, लक्ष्मण, हनुमान, सरस्वती, सीता अशी आहेत. जणू (गरीब) देवांची पंढरीच ती...! पण त्यांना कोण सांगणार ना, की, या जगात देवाच्या केवळ नावाने देववैभव प्राप्त होत नाही... पोटाची खळगी भरण्यासाठी जेव्हा 3-4 दिवसांच बाळ टाकून आईला कामावर जावे लागते, तेव्हा विश्वास दृढ व्हायला लागतो की 'देव' वगैरे सगळ अंधश्रद्धा आहे.
        11-12 वर्षाच्या मुलींना काय कळणार लग्न....? कसला करणार त्या संसार....? पण इथे अस्संच होतं. नाचण्या-बागडण्याच, भातुकली खेळण्याचं तींच वय... बाहुलीचं लग्न लावता लावता ती स्वतः च बाहुली होऊन जाते. आणि... बाहुलीचा चुल आणि मुलांचा संसार कधी तिचा होऊन जातो तिलाही कळत नाही... यांना प्रश्न विचारला तुम्हाला शिक्षण घ्यावसं नाही वाटत का? ते म्हणतात शिकताना काय पैसा मिळतो काय! हे उत्तर म्हणजे मला तर, कोणत्या ही सुशिक्षित भारतीयाला अक्षरश: शालजोडे मारल्यासारखे वाटते!
        यांना एवढचं माहिती आहे की आपल्याला भूक लागते, भूक लागल्यावर दोन घासांसाठी सुद्धा पैसाच लागतो!!! मात्र तो  मिळवण्यासाठी माध्यम निवडण्याचा पर्याय यांच्याकडे नाही. मिळेल ते काम करून 10-20 रूपयांसाठी झगडणे हेच त्यांचं आयुष्य. इथल्या भाबड्या लहानग्यांना आपल्याला 2000 रुपयांची नोट फक्त पाहायला मिळू शकते या नुसत्या कल्पनेनेच बावरायला होतं. आपण ज्या संस्कृतीच्या उपासक, विकसनशील, शिस्तप्रिय देशाचं गुणगाण गात जगभर मिरवतो ना... तो स्वतःचा देश "भारत"/ "India" देखील यांना माहित नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय...!
       जर भारत सुधारला म्हणजे प्रगतशील झाला असं वाटल ना, तर अर्धा तास Z bridge खाली येऊन बसायचं, वास्तवाची जाण होईल.
        खरचं, भारतातील दारिद्रय, उपासमार, कुपोषण, बालविवाह या एक ना अनेक समस्यांचं हुबेहूब चित्र इथं रेखाटलं आहे. Z bridge "वरून" बऱ्याचदा गेले असाल, एकदा खाली चक्कर टाका म्हणजे so called विकसनशील भारताचं खरं रूप पाहून डोळयांत क्षणभर का होईना पाणी तरळेल, अर्थातच संवेदनशील असाल तर!
        असो, हा झाला पुण्यातील डेक्कन शेजारचा 1 Z bridge. असे भारतात किती Z bridge आणि किती अशी लोक आहेत कोण जाणे?
        त्यांना दिवाळीचा फराळ, फटाके, चॉकलेट्स, ब्लॅकेट्स, कपडे देवून..., सहानुभूती देवून...दुबळा भारत बनवण्यापेक्षा, प्रत्येकाने एकाला एक तरी स्वप्न, इच्छा, आशेचा किरण दिला पाहिजे. तर कुठेतरी भारताची बंधुता, एकता, समता ही 'फक्त सांविधानिक' तत्त्वे अस्तित्त्वात यायला लागतील !!!

१८ मे, २०२१

मी आणि शाळा

           शाळेची भिती कधी वाटत नव्हतीच, शाळा म्हणजे दुसरं घरचं जणू! उत्सूकतेला मात्र मर्यादा उरली नव्हती कारण, मी आता मोठ्या वर्गात जाणार होते. नविन गणवेश, दप्तर, पुस्तक याचा तर आनंद होताच. तरीही शाळेच्या पहिल्या दिवशी मन धडधडतच होतं...! तस पहायला गेलं, तर आम्ही सर्व 4 थी चे विदयार्थी एकाच शाळेत, एकाच वर्गात होतो पण, मन भोळं घाबरतच होतं. आत्तापर्यंत दिवसभर एकच शिक्षक शिकवायचे. मात्र, इथे दर अर्ध्या तासाला घंटा वाजली की शिक्षक बदलायचे, याच तर नवलच निराळं!

            मला मराठीचा तास जरा जास्तच आवडायचा. कदाचित, जन्मतःच माझी मराठीशी नाळ जोडली गेली असेल! आम्हाला 5 वी मध्ये 'मला आवडते केली वाट वळणाची' ही कविता शिकवली होती आणि दुसऱ्या दिवशी ती सहाभिनय वर्गात सादर करायची होती. मला वाटतं, तो दिवस सगळ्या classmates ना चांगला आठवत असेल.

          अजून एक सारखी आठवणारी गोष्ट म्हणजे,- शाळेत परवानगी नसताना सर्वांनी वर्गात रंगपंचमी साजरी करून वर्गाचा चेहरामोहराच बदलला होता. त्यानंतर सरांनी चांगलाच चोप दिला होता ती गोष्ट सोडा..., आणखी एक वर्गातली गमतीशीर गोष्ट म्हणजे, गव्हाबरोबर खडे रगडले जात. विशेषत: खेळाच्या तासाला, चुक जरी काहीजणांची असली तरी प्रसाद सगळ्यांनाच मिळायचा. पण, हळूहळू जशा इयत्ता वाढू लागल्या, तसे मुली शांत, हुशार, अभ्यासू आणि मुलं मात्र आगावू, भांडखोर, चेष्टेखोर असं काहिसं झालं

           का कोण जाणे पण आमच्यात मुला मुलींच कधी जमलच नाही. अक्षरशः ३६ चा आकडा ! हा मात्र याला एक गोष्ट अपवादात्मक- शाळेचे क्रिडा सप्ताहाचे दिवस!!! आनंदोत्सवच म्हणा ना. मला चांगलच आठवत की, मुली कधी खो-खो च्या पुढे गेल्या नाहित आणि पोरांनी एक खेळ खेळायचा सोडले नाही!     

 मुला-मुलींनी मिळून केलेली खो-खो ची Practice, फेब-मार्च मधील सकाळची शाळा, रक्षाबंधन, ground वरचा वर्ग, जागा पकडण्याची धडपड या गोष्टी आठवल्या की उगाच मोठे झालो, असं वाटतं. मात्र यावेळी, मला.. "बदल हा निसर्गाचा नियमच आहे" हे एका सरांनी माझ्या माथी मारलेले वाक्य आठवले. असो, या आठवणी एवढ्यावर थांबणार नाही. 

         माझ्यासाठी शाळा ही नेहमीच आनंद, उत्साह, जिद्द, स्पर्धा, आस्थेचे प्रेरणास्थानचं! 

           वयक्तिक आयुष्यासाठी शाळेने मला खूप काही दिलं. अगदीच माझ्यातली मी ओळखायला शाळा आणि अर्थातच वंदनीय शिक्षक यांचा वाटा आहे हयात वावगं काही नाही. थोडक्यात, स्वतःची आवड, छंद, कला ओळखायला आयुष्य निधुन जातात, तिथं माझ्या शाळेने जगाच्या स्पर्धेत उतरण्या आधीच माझ्यातला शस्त्रांना धार लावून लढण्यास सज्ज केलं!

         कितीही नाकारला, तरी शाळा, शाळे तील मित्र-मैत्रिणी यांच्याप्रती जी आपुलकी आहे, ती कॉलेजमध्ये कितीही मोठं Friend circle असलं, तरी ते दिवस आणि आपुलकी विरळाचं!

नाही का... !!!

इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म...

Most viewed